जनता चिखलात पडायची वेळ आली तरी खड्ड्याकडे कोणी लक्ष देईना -तुळजापूर अपक्ष उमेदवार आण्णासाहेब दराडे

जनता चिखलात पडायची वेळ आली तरी खड्ड्याकडे कोणी लक्ष देईना -तुळजापूर अपक्ष उमेदवार आण्णासाहेब दराडे

Spread the love


धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण असलेले गाव असलेले नळदृर्ग येथील बस स्थानकात खड्डे पडले आहेत, खड्डे पडले असल्याने पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल आहे यात प्रवाशांना नीट चालता ही येत नाही नळदृर्ग येथील बस स्थानकात अशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे.तरीसुद्धा याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिल नाही. बस स्थानकातील खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये तुळजापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी या खड्ड्यात बसून निषेध व्यक्त केला. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा सर्वसामान्य नागरिक अजूनही खड्ड्यातूनच वाटचाल करतोय अशी खंत त्यांनी व्यक्त केली.आमदार खासदार मंत्री यांच्या घराभोवती असे खड्डे असतील का असं प्रश्न विचारात त्यांनी महाराष्ट्र मध्ये कित्येक बस बसस्थानक आजही गळके आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना तो त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणं असं असंच असतं का अशी खंत तुळजापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *