डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार ज्ञान स्पर्धेतील स्पर्धकांना बुध्दी पौर्णिमा दिनी पारितोषिकांचे वितरण
धाराशिव – त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटर धाराशिवच्यावतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती (बुद्ध पौर्णिमा) निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार ज्ञान स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यश मिळविलेल्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण बुद्ध पौर्णिमा दिनी दि.२३ मे रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.एस. सावंत व डोंबिवली येथील धम्मचारी अनोमदस्सी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ दत्तात्रय मुरुमकर, डॉ वीरेंद्र गवळी आदी उपस्थित राहणार आहेत.
जिल्हास्तरीय स्पर्धेत उमरगा येथील सानिया नबीलाल गुलफरेश (प्रथम) ७ हजार रुपये तर नंदिनी कमलाकर सुरवसे (द्वितीय) ५ हजार रुपये व तुळजापूर येथील अंजली मारुती कटकधोंड (तृतीय) ३ हजार रुपये तसेच प्रत्येक तालुक्यातील पहिल्या ३ विद्यार्थ्यांना अनुक्रमे १५०० रुपये, १००० रुपये व ५०० रुपये व ट्रॉफी अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. यामध्ये वाशी तालुक्यातील कु. संचिता सचिन कवडे – ८ वी, विरेंद्र अरुण मस्के – ९ वी व कु दिपाली प्रभाकर कवडे – १० वी तर कळंब तालुक्यातील कु मयुरी सुधाकर आवाड – ७ वी, संघपाल सुधाकर आवाड ६ वी व श्रिया संजय साळुंके – १० वी तसेच लोहारा तालुका तालुक्यातील आर्यन विठ्ठल मस्के – ११ वी, हर्ष बळीराम सुरवसे – ९ वी व
कु जान्हवी नरसाप्पा शिदोरे – ९ वी व धाराशिव तालुक्यातील श्रावणी अंकुश तौर – ८ वी,
प्रणाली मोहन नागटिळक – ६ वी व
आरुषी राजेश बचुटे – ९ वी तर उमरगा तालुक्यातील
संचिता नागनाथ भोसले, दीप्ती गोविंद कांबळे व मंदाकिनी ज्ञानेश्वर केसरे तर तुळजापूर तालुक्यातील
बोधने श्रुती श्रीशैल बोधने, प्राजक्ता परमेश्वर जाधव व
सोनाली संजय राठोड -७ वी तसेच भूम तालुक्यातील प्रज्ञा दीपक नाईकनवरे, प्रथम दिलीप इजगज व सोनाली सिताराम गरड हे अनुक्रमे संबंधित तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेले आहेत. विशेष म्हणजे जिल्हास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय स्पर्धकांना पारितोषिकाच्या ५० टक्के रकमेचे ग्रंथ देऊन गौरविण्यात येणार आहे. त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटर धाराशिवच्यावतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती (बुद्ध पौर्णिमा) निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार ज्ञान स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत यश मिळविलेल्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण बुद्ध पौर्णिमा दिनी दि.२३ मे रोजी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम धाराशिव शहरातील शाहू नगरमधील व्हिजन करीअर अकॅडमी येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्रिरत्न बुद्धिस्ट सेंटरच्यावतीने केले आहे.